शरद पवारांनी रद्द केले सर्व सामाजिक कार्यक्रम, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
शरद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

ट्विट करून दिली माहिती

'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.' असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. यानंतर शरद पवारांनी ट्विट करत त्यांचे नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करीत असल्याची माहिती दिली आहे.

लॉकडाऊनचा निर्णय जनतेच्या हातात-

पुढचे आठ दिवस मी तुम्हाला देत आहे. तुम्ही कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करा. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे तुमच्या हातात आहे, असे मुख्यमंत्री जनतेला केलेल्या संबोधनादरम्यान बोलताना म्हणाले. लॉकडाऊनसंदर्भात येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

सभा, समारंभांवर बंदी-

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता काही प्रतिबंधात्मक नियमांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम आता ऑनलाईन होतील असेही ते म्हणाले. तसेच राज्यात सर्वच राजकीय सामाजिक, धार्मिक अशा सार्वजनिक कार्यक्रमावर बंधने घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनांवरही यावेळी बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी सरकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

'मी जबाबदार' ही नवी मोहीम-

कोरोनाशी लढण्यास मी जबाबदार, अशी मोहीम राबवण्यात येईल असेही ते म्हणाले. जनतेने मास्क वापरावा. सॅनीटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वर्क फ्रॉम होमवर भर द्या-

वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन वेळांचेही योग्य नियोजन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अधिकाधिक प्रमाणात वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करतानाच जिथे कार्यालयात येण्याची गरज आहे. तिथे कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या टीममध्ये विभागणी केली जावी. त्यांना 15 दिवसांच्या अंतराने कार्यालयात बोलाविले जावे. अशा प्रकारे नियोजन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.